मुंबई: मुंबईमधल्या रेल्वे अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. रेल्वेनं दिलेल्या धडकेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चौघंही रेल्वेचे कर्मचारी होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर ते कुर्लादरम्यान हे कर्मचारी रेल्वेच्या ट्रॅकचं काम करत होते, तेव्हा ट्रेननं त्यांना धडक दिली. या चौघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं होतं. पण तिकडे त्यांचा मृत्यू झाला.