मुंबई : शरद पवारांना पद्मविभूषण हा पुरस्कार उशीराने मिळाला, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली. 


शरद पवार यांनी राजकारणात ५० वर्ष पूर्ण केली. त्यांनी त्यापूर्वीपासूनच कामाला सुरूवात केली आहे.  मिळालेल्या पुरस्काराबद्दल  चुकीचा की वाईट बोलू नये, पण उशीर झाला. क्रीडा, कृषी, उद्योग, रोजगार निर्मिती क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वीच पुरस्कार मिळायला पाहिजे होता.