मुंबई : गुरुवारी मुंबईत गोरेगावच्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा पोपट मेल्याचं अखेर जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जेव्हा कळली तेव्हा योगायोगानं त्यांच्यासोबत त्यांच्या अमृता फडणवीसही होत्या... ही बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? किंवा अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया काय होती? हा साहजिकच अनेकांना पडलेला प्रश्न... 


एका चॅनेलवर बोलताना अमृता फडणवीस यांनी बोलताना अगदी सहजच या प्रश्नाचं उत्तर देऊन टागलं. ही बातमी समजली तेव्ही मुख्यमंत्री फडणवीस आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहत होते... बाजुला बसलेल्या अमृता फडणवीस यांच्याकडे पाहत त्यांनी अगदी शांत चेहऱ्यानं 'युती तुटली' एव्हढचं म्हटलं... त्यावर अमृता फडणवीस यांनीही तितक्याच शांततेने 'हो का... बरं झालं तुमच्यासाठी' असं म्हटलं... 


हा हलका फुलका किस्सा सांगत असतानाच, देवेंद्रजींच्या शांत चेहऱ्यामागे आत काय सुरू असतं... हे कधी कधी कळत नाही, अशीही भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 


गुरुवारी, उद्धव ठाकरेंनी यापुढे शिवसेना कधीच युती करणार नाही... भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावणार असं म्हणत युती तोडल्याचं जाहीर केल्यानंतर 'सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच' असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.