मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापु लागलं आहे. नेहमी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपात आता मुंबईत फूट पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणूकीत भाजपने नावा नारा दिला असून ११४ प्लस जागा मिळविणार असल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी भाजप आगामी निवडणूक स्वबळावर लढवून ११४ प्लस जागा मिळवेल आणि भाजपचा महापौर मुंबई होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 


भाजपने हा नारा देऊन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 


भाजपने विश्लेषण एजन्सीच्या मदतीने ११४ प्लस हा आकडा काढल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. तसेच या संदर्भात भाजपातील सुत्रांनीही पुष्टी केली आहे. त्यामुळे शिवसेना डिवचण्याची संधी भाजपला मिळाली आहे.