मुंबई : आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांमध्ये मध्य रेल्वेच्या कुर्ला ते कल्याण आणि कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत मार्गावरील प्रवाशांसाठी 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.


त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवास काहीसा सुकर होईल अशी आशा आहे. फेऱ्या वाढणार असल्यानं वेळापत्रकाही बदल होईल. काही अस्तित्वात असणाऱ्या गाड्यांचा विस्तारही करण्यात आलाय.