मुंबई : ऑगस्ट महिन्याची सुरुवातच रेल्वेच्या रखडपट्टीनं झालीय. मध्य रेल्वे मार्गावरील पत्री पुलाजवळ कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल रेल्वे रुळावरुन घसरल्याने प्लॅटफॉर्म नंबर १ आणि १ ए हे दोन्ही प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत. मध्य रेल्वे सध्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते आहे. 


तत्पूर्वी, आज सकाळी मध्य रेल्वेवरच्या खर्डी स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं त्याचा परिणामदेखील रेल्वेवर झाला होता.