मुंबई : दहा महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडवण्यासाठी आता अगदी काही तास उरलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज संध्याकाळी साडे पाच वाजता महापालिकांचा तर मध्यरात्री जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांचा प्रचार संपणार आहे. 


त्यामुळे शेवटच्या दिवशी जितक्या मतदारांपर्यंत पोहचता येईल यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतील. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींना गाठलेला कळस आज शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल.


प्रचाराचा आज सुपर संडे पाहायला मिळेल. अखेरच्या दिवशी अनेक राजकीय पक्ष प्रचारांचा धडाका लावतील. दहा महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी 21 फेब्रुवारीला मतदान होतंय. तर 23 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.