मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांत मुंबई आणि ठाणेकरांना मुसळधार पावसाला तोंड द्यावं लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आत्ताच वाहतुकीचा बोजवारा उडालाय. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय. रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. त्या पार्श्वभूमीवर पुढच्या ४८ तासांचा हा इशारा महत्त्वाचा ठरणार आहे. 


ठाणे तहसिलदार कार्यालयानं रेस्क्यू टीमला अलर्ट राहण्यास सांगितलंय. पारसिक आणि बेलापूरनजिकच्या सखल भागांना इशारा देण्यात आलाय.