मुंबई : बॅकांचे घोटाळे लपविण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे, असे प्रत्युत्तर कर्जमाफीच्या निवदेनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे.


शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेत गोंधळ विरोधकांनी घातला. या गोंधळातच मुख्यमंत्र्यांनी आपले निवदेन दिला. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांची वेलमध्ये घोषणाबाजी दिला. शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी दिलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्यात. गोंधळामुळे अर्धा तास विधानसभा कामकाज तहकूब करण्यात आले.