मुंबई :  सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवलिये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नितेश राणे यांना मातोश्रीच अंगण काय असत हे मागच्या निवडणुकीमध्य़े माहीत पडलंय. त्यामुळे पुन्हा त्यांनी मातोश्रीच्या अंगणाचा विषय काढू नये असा टोला शिवसेनाच्या अनिल परबांनी लगावलाय.


गेल्या आठवड्यात राज्यभरात सुरु असलेल्या मूक मोर्चाबाबत वादग्रस्त व्यंगचित्रावरुन उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली होती. जनतेच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी म्हटले होते.