बारामती : ठाणे मनपासाठी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधामुळेच मुंबईमध्ये आम्हाला स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घ्यावी लागली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये राष्ट्रवादी ने 45 जागावरंती उमेदवार घोषित केलेले असून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांवबाबत अजित पवारांच्या उपस्थित १९ तारखेला बैठकीत शिक्कामोर्तब करणार आहोत, असं तटकरे म्हणैाले आहेत. अन्य ठिकाणी आघाडी करण्यासाठी काँग्रेसशी चर्चा झालेली आहे. स्थानिक पातळीवरती काही जिल्हा परिषद आणि महानगर पालिकांमध्ये आघाडी होऊ शकते, असं तटकरेंनी स्पष्ट केलंय.