मुंबई : कर्ज पुनर्गठन योजनेचा अजूनही साडेचार लाख शेतकऱ्यांना फायदाच न झाल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावतं यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झालंय़.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज पुनर्गठन करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. 


साडे चार लाख शेतकरी २०१२-१३ आणि २०१३-१४ चे थकबाकीदार असल्याने पुनर्गठनासाठी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी आवश्यक आहे.


 सरकारनं मागितलेली परवानगी रिझर्व्ह बॅंकेनं नाकारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकलेला नाही.