मुंबई : विधानसभेतील विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, तसेच कामकाजावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विधानसभेतील तिढा सुटणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर संख्याबळ जास्त असल्याने विधानपरिषदमध्ये कामकाजात सहभाग असेल, मात्र कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी  घेतली आहे. त्यामुळे अधिवेशनचा चौथा आठवड़ामध्ये कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी सत्ताताधारी काय करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


तीन दिवसांच्या खंडानंतर आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाचा हा चौथा आठवड़ा असून विधानपरिषदमध्ये विरोधकांच्या आक्रमकपणामुळे अजिबात कामकाज झाले नाही.  तर विधानसभेत विरोधकांच्या बहिष्कारामुळे विधानसभा चर्चेत राहीलेली आहे. 


विधानसभेत येऊन विरोधकांनी सरकारला विनंती केली तर अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घातलेल्या काही आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा करू अशी भूमिका राज्य सरकारने गेल्या शनिवारी घेतली होती. तेव्हा विधानसभेत विरोधक उपस्थित राहतात का याकडे लक्ष असणार आहे.