मुंबई : शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेत इच्छूकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी जास्त झालीय. मात्र बंडखोर दोन दिवसांत अर्ज मागे घेतील. त्यासाठी स्वतः लोकसभा मतदार संघात वॉर्डात फिरेन, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.


जे शिवसेना सोडून जातात त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांचे काय झाले ते लक्षात घ्यावं, असं म्हणत शेवाळे यांनी नाना आंबोले यांनाही इशारा दिला.