मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आगपाखड केलीय. 
 
भाजपच्या काही नेत्यांनी आपल्या जीभेवर ताबा ठेवला असता तर राज्यात शिवसेनेसोबत संबंध इतके टोकाला गेले नसते, असंही राऊत यांनी म्हटलंय. एक काळ असा होता की गल्लीतला कुत्रादेखील भाजपसोबत नव्हता.. तेव्हा आमचा पक्ष त्यांच्यासोबत उभा राहिला... बाळासाहेब ठाकरे यांचा हात नेहमीच त्यांच्या खांद्यावर होता... अशीदेखील राऊत यांनी भाजपला आठवण करून दिलीय. 


पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना वायफळ बडबड टाळण्याच्या दिलेल्या सल्ल्याचं राऊतांनी स्वागतच केलं. पण, हेच पंतप्रधानांनी अगोदरच केलं असतं तर शिवसेना आणि भाजपचे संबंध इतके टोकाला गेले नसते, असंही त्यांनी म्हटलंय.