जालना : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’ 


जालना जिल्ह्यातील 143 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजार रूपये मदतीच्या धनादेशाचे तटकरेंच्या हस्ते वाटप करण्यात आले.  जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दुष्काळी परिषदेचं आयोजन करण्यात आल होतं. त्यावेळी तटकरे बोलत होते.