मुंबई : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशामधील राष्ट्रीय महामार्गांवर आता १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी असणार आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी यापूर्वी शुक्रवारी, ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. आता यात आणखी तीन दिवस वाढ करण्यात आलेय, तशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.


महामार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी ही टोलमाफीची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती अर्थमंत्री सुधीन मुनगंटीवर यांनी माहिती दिली आहे. वाहनधारक आणि चालकांना मोठा दिलासा दिला आहे.