मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील वाद आता जग जाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिले. हिम्मत असेल तर युती तोडा, असे आव्हान दसरा मेळाव्याच्यावेळी दिले होते. त्यानंतर आज  सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावे मित्राला संपवा, अशी पोस्ट व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि शिवसेनेकडून आगामी पालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत स्वबळाची चाचपणी सुरु आहे. भाजपने तशी तयारी केली आहे. त्याचवेळी शिवसेनेकडून सातत्याने भाजपला टार्गेट करण्यात येत असल्याने भाजपही नाराज आहे. मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युतीत फूट पडली आणि शिवसेना - भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले. गेली 25 वर्षांची युती तुटल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. त्यानंतर जिथे जिथे संधी मिळेल त्यावेळी सत्तेत राहूनही भाजप शिवसेनेने टीका केली. याची सल भाजपला आहे.


आता, सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट उद्धव ठाकरेंची आहे की नाही याची खातरजमा होत नाही. आपण सगळ्यांना हरवले आहे. आता शेवटची लढाई ही आपल्या मित्राशी आहे, आपण जर याला हरवले तर आपण सर्वश्रेष्ठ ठरु असे म्हटले आहे.