मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना स्थान मिळालं पण आमच्या विश्वासाला तडा गेला. काचेला तडा गेलाय पण ती पूर्ण फुटू देऊ नका अशाच शब्दात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आपली नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी अन्याय दूर करू असं म्हटलंय पण कधी ते मात्र सांगितलेलं नाही. दस-यापर्यंत आमचं परिमार्जन करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.  शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात ते बोलत होते.


तर सरकारमध्ये सहभागी करुन न घेतल्यामुळे नाराज होऊ नका...मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी देण्याचं आहे. मला मर्यादा असल्यामुळे मी आता काही खुलासा करू शकत नसल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली.