मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला. पण असं असलं तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम आहे. मुंबईकरांची 20 टक्के पाणी कपात कायम राहणार आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यामुळे ही पाणीकपात कायम राहिल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. 


तर दुसरी कडे दुसरीकडे ठाण्यातही सकाळपासून पावसानं जोर धरला. पाचपाखाडी ,वंदना आणि राबोडी या ठिकाणी सखोल भागात पावसाचे पाणी साचले होते. पावसानं दुपारी उघडीप घेतली असली तरी संध्याकाळपर्यंत रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे गारवा निर्माण झाला होता.