रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर एक बाद १२० धावांपर्यंत मजल मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. यात रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच बळी घेतले. त्याच्या पंचकच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव ४५१ वर संपुष्टात आला. 


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडून मुरली विजय ४२ तर चेतेश्वर पुजारा १० धावांवर खेळत होते. सलामीवीर लोकेश राहुलने ६७ धावांची दमदार खेळी केली. तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्यासाठी भारताच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहत फलंदाजी करणे गरजेचे आहे.