मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये भारताने खूप मोठा आणि जबरदस्त विजय साकारला. विराटने भारताला पुन्हा एकदा विराट विजय मिळवून दिला. आजच्या या मॅचचा हिरो पुन्हा एकदा विराट कोहली ठरला आणि विराटवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताला विराटच्या रुपाने हिरा सापडला आहे असं इतर देशातील क्रिकेटर ही आज बोलतात. पाकिस्तान विरोधातील मॅचनंतर विराटला त्याची एक्सगर्लफ्रेंड अनुष्का शर्माने मॅसेज केला होता. अनुष्का आणि विराट यांच्या ब्रेकअप झाला आहे.


भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळविल्यावर १२५ कोटी भारतीय जसे खुश झाले तसे विराट कोहलीची एक्स गर्लफ्रेंडही जाम खूश झाली असेल का.  
भारताच्या विजयाबद्दल आणि विराटच्या शानदार खेळीबद्दल अनुष्का शर्माने मेसेज करेल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  

यापूर्वी केले होते मेसेज
भारताने विजय साकारल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने विराटचे अभिनंदन करणारे मेसेज विराटला यापूर्वी पाठविले आहे. आता त्यांनी ब्रेकअप बाजूला ठेवून चांगल्या मित्राप्रमाणे मेसेज करेल का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.