बंगळुरू : तिसऱ्या टी20मध्ये भारतानं इंग्लंडला 75 रननी धूळ चारत मालिका खिशात टाकली. एवढ्या दारूण पराभवामुळे 71 वर्षांमधल्या दुसऱ्या वाईट रेकॉर्डची नामुष्की इंग्लंडवर ओढावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये इंग्लंडनं आठ रनमध्ये शेवटच्या आठ विकेट गमावल्या. 119रनवर इंग्लंडची तिसरी विकेट गेल्यानंतर 127 रनवर त्यांचा शेवटचा बॅट्समन आऊट झाला. याआधी 1946साली न्यूझिलंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये पाच रनवर आठ विकेट गमावल्या होत्या.