मोहाली : न्यूझीलंडविरुद्धच्या मोहाली वनडेमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं 151 रनची पार्टनरशीप करून भारताला जिंकवून दिलं. या मॅचमध्ये कोहलीनं 154 रनची तर धोनीनं 91 बॉलमध्ये 80 रन बनवल्या. मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र धोनीनं खंत व्यक्त केली आहे. स्ट्राईक बदलण्याची माझी क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे, माझ्यामध्ये आता एवढी उर्जा राहिली नसल्याचं धोनी म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेकवेळा मी सहा नंबरवर बॅटिंगला येतो तेव्हा पटापट धावून रन काढणं कठीण होतं, म्हणून या मॅचमध्ये मी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आल्याची प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे. हे वक्तव्य करतानाच या पुढच्या मॅचमध्येही चौथ्या क्रमांकावरच बॅटिंगला यायचे संकेतही धोनीनं दिले आहेत.