मुंबई : भारतीय क्रिकेट फॅन हे जगातील कोणत्याही कोपऱ्यात मॅच असली तरी ती बघण्यासाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप फायनलमध्ये भारतीय समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित नव्हते. बांग्लादेशच्या होम ग्राऊंडवर मॅच असल्याने बांग्लादेश समर्थक मोठ्या प्रमाणात मैदानावर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले होते. 


बांग्लादेश विरोधातील या मॅचमध्ये विराट कोहली हा बांग्लादेशच्या समर्थकांच्या निशान्यावर होता. याआधीही ऑस्ट्रेलियामध्ये विराटला चिडवण्याचं काम ऑस्ट्रेलियन समर्थकांनी केलं होतं ज्याविरोधात कोहलीने त्याना मधलं बोट दाखवल्याने त्याच्यावर दंड देखील लावण्यात आला होता.


फायनल मॅचमध्ये देखील कोहली हा बांग्लादेशी समर्थकांच्या निशान्यावर होता. विराटने रहीमला रन आऊट आणि मूर्तजाचा कॅच घेत बांग्लादेशी समर्थकांचं तोंड बंद केलं. शिवाय विराटच्या बॅटने ही प्रत्येक मॅचमध्ये कमाल केली.


मॅचदरम्यान समर्थक जर विराटच्या विरोधात असतील तर विराट मैदानावर त्यांना सडेतोड उत्तर देतो आणि याचा फायदा निश्चितच टीम इंडियाला होतो.