हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला. मागच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकवणारा के.एल.राहुल 33 रनवर आऊट झाला, तर करुण नायरनं 39 रन अंबाती रायडूनं नाबाद 41 रन आणि मनिष पांडेनं नाबाद 4 रन केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि भारतीय बॉलर्सनं झिम्बाब्वेला फक्त 126 रनमध्ये गुंडाळलं. लेग स्पिनर युझुवेंद्र चहालनं 3 विकेट तर बरिंदर सरन आणि धवल कुलकर्णीला प्रत्येकी दोन आणि जसप्रीत बुमराह आणि अक्सर पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. 


या विजयामुळे भारतानं झिम्बाब्वेविरुद्धची 3 मॅचची ही सीरिज 2-0नं जिंकली आहे. या सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वनडे 15 जूनला हरारेमध्येच होणार आहे.