मुंबई : आयसीसी वर्ल्डकप टी-२० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी मॅच होणार आहे. धर्मशाळा येथे होणारी मॅच ही सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाता येथील इडन गार्डन या मैदानावर खेळली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकप मध्ये भारताचा पाकिस्तानला हारवण्याचा रेकॉर्ड आहे पण पाकिस्तानने नेहमी इडन गार्डन या मैदानावर भारताचा पराभव केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात होणारी ही मॅच आता यामुळे आणखी रोमांचक होणार आहे.


वर्ल्डकपमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये ४ सामने झाले आहेत ज्यामध्ये सगळे सामने भारताने जिंकले आहेत. १९९२ साली पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला होता पण त्यावेळेस देखील भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.


कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एकही टी-२० सामना झाला नाही. पण ४ वनडे मध्ये पाकिस्तानने सगळे सामने जिंकले. त्यामुळे दोघांमध्ये कोण आपलं रेकॉर्ड कायम ठेवतं याचा उत्सुकता आता आणखी वाढणार आहे.