पुणे : ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ फसलेला दिसतोय. अवघ्या ९९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टीव्ह ओकेफीने तब्बल पाच बळी मिळवत भारताच्या दुसऱ्या डावालाही खिंडार पाडलेय. त्याच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा लोटांगण घातलेय. मैदानावर चेतेश्वर पुजारा खेळत आहे. 


भारत अद्यापही दुसऱ्या डावात ३४२ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ४ फलंदाज शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाकडून होत असलेली तगडी गोलंदाजी पाहता भारत पराभवाच्या गडद छायेत आहे.