दुबई : श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे. नंबर एक वर कायम राहण्यासाठी भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी टेस्ट जिंकावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आजपासून सुरु होणारी टेस्ट भारत जिंकला तर भारताकडे 112 पॉईंट्स होतील, आणि भारत एक नंबरवर कायम राहिल. ही मॅच ड्रॉ झाली तर भारताचे 110 पॉईंट्स होतील आणि पाकिस्तान एक नंबरवर जाईल. वेस्ट इंडिजविरुद्धची ही मॅच भारत हारला तर भारताचे 108 पॉईंट्स होतील आणि कोहलीची टीम चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल. 


काय आहे आत्ताची क्रमवारी 


 टीम                     पॉईंट्स


1 भारत                   112


2 पाकिस्तान            111


3 ऑस्ट्रेलिया            108 


4 इंग्लंड                   108


5 न्यूझिलंड               99


6 श्रीलंका                  95


7 दक्षिण आफ्रिका      92


8 वेस्ट इंडिज            65


9 बांग्लादेश              57


10 झिम्बाब्वे             8