कुआनटन : भारतीय हॉकी टीमनं आशियाई हॉकी चॅम्पियनशिप्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4नं विजय साकारत भारतानं फायनल गाठली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमी फायनलमध्ये भारत आणि दक्षिण कोरियाचा स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता. पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन आणि गोलकिपर पी.आर.श्रीजेशनं दक्षिण कोरियाच्या पाचव्या प्रयत्नावर उत्तमरित्या बॉल अडवत विजय साकारून भारताचं फायनलचं तिकीट निश्चित केलं.


आता फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तान किंवा मलेशियातील सेमी फायनलसाठी होणा-या मॅचमधील विजेत्याशी होईल.