मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धर्मशाळा येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पथकाने या सामन्याला हिरवा कंदील दिला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी मागच्या आठवडयात भारत-पाकिस्तान सामन्याला सुरक्षा देण्यास असमर्थता दाखवली होती. त्यामुळे सामन्या बाबत साशंकता होती.


धर्मशाळाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक यांनी पाकिस्तानच्या या २ सदस्यांना पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाची पथके तैनात करण्याचे आश्वासन दिले आहे. 


स्पर्धेचे संचालक एमव्ही श्रीधर यांनी गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना नियोजित वेळापत्रकानुसारच होईल असे स्पष्ट केलं आहे.