फ्लोरिडा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा केवळ 1 रननं पराभव झाला होता. त्यामुळे 2 मॅचच्या या सीरिजमधली ही मॅच जिंकणं भारतासाठी गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मॅच भारत हरला तर सीरिजबरोबरच आयसीसीच्या टी-20 क्रमवारीमध्येही भारताचा दुसरा क्रमांक जाणार आहे. या मॅचमध्ये भारतानं टीममध्ये एक बदल केला आहे. मागच्या मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 32 रन देणाऱ्या स्टुअर्ट बिनीऐवजी लेग स्पिनर अमित मिश्राला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.