मोहाली :   येत्या शुक्रवारी मोहालीच्या पीसीए स्टेडिअम रंगणाऱ्या सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण पॉइंट्स टेबलवर नजर टाकली असता भारताला सेमी फायनलमध्ये बिनधास्त जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाकिस्ताने पराभूत करणे गरजेचे आहे.


आता पाकिस्तान कसा खेळतो यावर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या विजयासाठी भारतीय प्रेक्षक प्रार्थना करणार आहे. 


पाकिस्तानच्या चौकार, षटकार आणि विकेटवर होणार जल्लोष 


भारतीय क्रिकेट रसिक  पाकिस्तानच्या प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेटवर जल्लोष करण्याची शक्यता आहे. 


पाकिस्तानला का द्यावा पाठिंबा


- भारताचे ४ गूण 
- पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे २ गूण 
- ऑस्ट्रेलियाचे दोन सामने शिल्लक 
- पाकिस्तानचा केवळ एक सामना शिल्लक


भारताला काय फायदा 


-पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया पराभूत केले तर पाकिस्तानचे चार गूण होतील पण त्यांचे सामने संपले आहे. 
- ऑस्ट्रेलिया विरूद्ध सामना भारताने गमवला तर रन रेटवर सर्व काही ठरणार आहे. 
- भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध  सामना जिंकल तर थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश