मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०१६ च्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्यामध्ये भारताचा पराभव झालाय. भारतीय महिला खेळाडूनी आजची मॅच ही खूप कमी फरकाने गमावली. भारतीय महिला संघाला आजच्या मॅचमध्ये ही ३ रन्सने पराभव स्विकारावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला संघाकडून अनुजा पाटील हिने सर्वाधिक २६ रन्स केले तर वेस्ट इंडिजकडून टेलर हिने सर्वाधिक ४७ रन्स केले. अनुजा पाटील हिने ३ तर कौर हिने ४ विकेट्स घेतले. वेस्ट इंडिजच्या डोटेन हिने ३ विकेट्स घेतले.


आजच्या पराभवानंतर भारतीय महिला संघाचं वर्ल्डकप टी-२० २०१६ मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. वेस्ट इंडिजने हा सामना ३ रन्सने जिंकत भारतीय महिला संघाचा वर्ल्डकपमधला प्रवास थांबवला आहे.