नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवालने आपल्या बॅडमिटनमधील करिअरबाबत मोठे विधान केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिओ ऑलिंपिकमध्ये दुखापतीमुळे पहिल्याच फेरीत बाहेर पडलेली सायना पुनरागमनाच्या तयारीत आहे. मात्र बॅडमिंटनमधील आपले करिअर संपले अशी भिती तिला वाटतेय. 


एका मुलाखतीत तिने हे विधान केलेय. लोकांना वाटत असेल की माझे करिअर संपलेय. मी पुनरागमन कऱणार नाही. मलाही मनातून असेच काहीसे वाटते आहे. बघू पुढे काय होतं ते. काहीही होऊ शकते. ज्याची कल्पना कोणालाही नाही, असे सायना म्हणाली.