अहमदाबाद : कोरियाबरोबर झालेली पहिली मॅच हरल्यानंतर अखेर भारतानं कबड्डी वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाचा 54-20 नं धुव्वा उडवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये भारतानं राहुल चौधरी आणि जसवीर सिंग यांना बाकावर बसवलं आणि त्यांच्या जागी प्रदीप नरवल, संदीप नरवलला संधी दिली. भारताच्या या विजयामध्ये मोलाची कामगिरी केली अजय ठाकूरनं अजयनं भारताला सर्वाधिक 7 पॉईंट्स मिळवून दिले.


यानंतर भारत आता मंगळवारी बांग्लादेशबरोबर पुढची मॅच खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा सामना सोमवारी इंग्लंडबरोबर होणार आहे.