धर्मशाळा : भारत विरुद्ध पाकिस्तान असा धर्मशाळामध्ये होणारा सामना रद्द होण्याची चिन्हं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पठाणकोट आणि पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्मशाळामध्ये या मॅचला विरोध सुरू झालाय. ही मॅच येत्या १९ मार्च रोजी होणार आहे. 


काँग्रेसनं याविषयी कठोर भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत ही मॅच होऊ देणार नसल्याचं म्हटलंय.  


परंतु, ही मॅच इथे खेळवण्याबद्दल एक वर्षभरापूर्वीच निर्णय झालाय. यावर आता केंद्र सरकारनंच निर्णय घ्यावा, असं बीसीसीआयनं म्हटलंय. याबद्दल बीसीसीआयनं हिमाचल प्रदेश सरकार आणि पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. 


तर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून हल्ल्याची शक्यता व्यक्त केलीय.