मुंबई : एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचलीये. बुधवारी रात्री कर्णधार विराटसह सर्व क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना झाले. मात्र भारताचे दोन क्रिकेटर टीमसोबत जाऊ शकले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आणि केदार जाधव टीमसोबत गेले नाहीत. दरम्यान केदार जाधव शुक्रवारी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. व्हिसा वेळेत न मिळाल्याने तो टीम इंडियासोबत जाऊ शकला नाही.


तर दुसरीकडे रोहित शर्माच्या घरात लग्नकार्य असल्याने तो भारतात थांबलाय. यासाठी रोहितने बीसीसीआयकडून आधीच परवानगी घेतली होती. हे दोन्ही क्रिकेटपटू २८ मेला होणाऱ्या वॉर्म अप मॅचसाठी टीम इंडियामध्ये सामील होतील.