मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच अभय शर्मा यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी 18 महिने रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या डायरेक्टर पदाची धुरा सांभाळली होती. ऑगस्ट 2014 मध्ये भारताचा इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजमध्ये 1-3 नं पराभव झाला होता, तेव्हा शास्त्रीनं हे पद घेतलं होतं.  


रवी शास्त्रीबरोबर संजय बांगर, आर.श्रीधर आणि भारत अरुण हे तिघंही कोचिंगचे भाग होते. शास्त्रीनंतर या तिघांनाही झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये संधी दिली जाणार नाही अशा चर्चा होत्या, पण बीसीसीआयनं मात्र संजय बांगरलाच पसंती दिली आहे.