नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार बॅटिंगने विराट कोहली बहुचर्चेत होताच. आय.पी.एल. ९ मध्येही विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भलेही हरला असेल. पण विराटने त्याच्या बॅटिंगने सर्वांची मने जिंकली आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने १६ मॅचमध्ये ९७३ रन्सचा रेकॉर्ड बनवून तो आयपीएल ९ मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय. १६ मॅचमध्ये विराटने ४ शतके आणि ७ अर्धशतके मारलीयेत. त्याचा स्ट्राईक रेट १५२.०३ होता. सनरायजर्स हैदराबाद चा कॅप्टन डेव्हीड वॉर्नरने १७ मॅचमध्ये ८४८ रन्स करून दुसरे तर एबी डिव्हिलियर्सने १६ मॅचमध्ये ६८७ रन्स करून तिसरे स्थान पटकावले.

विराट कामगिरीची एक झलक!!!