हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यातील अंतिम सामना चांगलाच अटीतटीचा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. शेवटच्या षटकांत दोन्ही संघाच्या चाहत्यांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले होते. पारडे कोणत्याही संघाच्या बाजूने झुकेल असे वाटत होते. अखेरच्या चेंडूत पुण्याला विजयासाठी ४ धावांची गरज होती. मात्र पुण्याला केवळ एक धाव करता आली आणि मुंबईचा विजय झाला. 


मुंबईच्या विजयानंतर सोशल मीडियावर या आजींची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे. या आजींमुळेच मुंबई जिंकल्याचे म्हटले जातेय. या आजींच्या नावाने अनेक जोक्स सुरु आहेत. 



आई शप्पथ सांगतो......


 


 


 



पुणे फक्त त्या म्हतारी मुळेच हारली.......


कसले हातापाया पडत होती....
मग काय पुणेरी स्वाभिमान....


पण आई शप्पथ म्हतारी लई डेंजर आहे....