मिरपूर : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार टीका होत आहे. ट्विटरवर तर अनेकांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पाच विकेटनी धूळ चारली आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये आता भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. 


मात्र ट्विटरवर यावरुन पाकिस्तान संघाची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. काहींनी तर असं म्हटलंय की फायनलमध्ये विराट कोहलीचा सामना करावा लागू नये म्हणून पाकिस्तानी संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याता पराभव पत्करण्याचे ठरवले.