COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नवी दिल्ली : महिलांच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं. 


सामन्यातील १६व्या ओव्हरदरम्यान निदार दासच्या फुलटॉस चेंडूवर भारताच्या वेदा कृष्णमूर्तीने फटका लगावला. यावेळी हा चेंडू सीमापार न जाण्यासाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने हाताने चेंडू पुढे ढकलला. हा चेंडू घरंगळत पुढे गेला. 


मात्र यावेळी बाऊंड्री लाईनजवळ दोन चेंडू पाहायला मिळाले. यावेळी कोणता चेंडू घ्यावा असा प्रश्न पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना पडला मात्र त्यांनी योग्य चेंडू उचलत बॉलरच्या दिशेने फेकला. या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानचा दोन धावांनी विजय झाला.