कोलकाता : पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी ईडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला. या सामन्यात विराटने ३७ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार लगावताना नाबाद ५५ धावा फटकावल्या. 


विराटने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला अनोख्या शैलीत सलाम केला. विराट नेहमीच सचिनला आदर्श मानतो. त्याच्यामुळेच आपण क्रिकेट खेळायला लागलो असे तो सांगतो.