पुणे : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे. पुण्याविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये आरसीबीचा ६१ रन्सनं पराभव झाला आहे. विजयासाठी १५८ रन्सचा पाठलाग करताना आरसीबीला २० ओव्हर्समध्ये फक्त ९६ रन्स बनवता आल्या. विराट कोहलीच्या ५५ रन्सचा अपवाद वगळता आरसीबीच्या एकाही बॅट्समनला दोन अंकी धावसंख्या बनवता आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये झालेल्या या मॅचमध्ये आरसीबीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि पुण्याला १५७ रन्समध्ये रोखलं. पुण्याच्या त्रिपाठीनं ३७, स्मिथनं ४५, तिवारीनं नाबाद ४४ आणि धोनीनं नाबाद २१ रन्स बनवल्या.


पॉईंट्स टेबलमध्ये आता ९ मॅचमध्ये १० पॉईंट्ससह पुण्याची टीम चौथ्या क्रमांकावर आहे तर १० मॅचमध्ये ५ पॉईंट्स मिळवलेली आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे. या पराभवामुळे आरसीबीच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहेत.