मुंबई : विराट कोहली हा घमेंडी आहे अशी टीका वेस्ट इंडिजचा बॅट्समन लँडल सिमन्स यानं केली आहे. ही टीका करताना सिमन्सनं टी 20 वर्ल्ड कपमधल्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचचा दाखला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये मी बॅटिंगला आलो तेव्हा कोहली मला काहीतरी बोलला. तेव्हा मी मनाशी ठरवलं की मी कोहलीला दाखवून देईन की फक्त तोच चांगला बॅट्समन नाही, असं सिमन्स म्हणाला आहे. विराट उद्धट आणि आक्रमक आहे, त्यामुळे तो बॅटिंगही तशीच करतो, अशी प्रतिक्रिया सिमन्सनं दिली आहे. 


वानखेडेवर झालेल्या या सेमी फायनलमध्ये भारतानं 192 रन केल्या होत्या. या मॅचमध्ये कोहलीनं 47 बॉलमध्ये 89 रन केल्या होत्या. 193 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सुरवातीलाच गेल आणि सॅम्युअल्सच्या रुपात दोन धक्के बसले होते. 


यानंतर बॅटिंगला आलेल्या सिमन्सनं 51 बॉलमध्ये 82 रन करून वेस्ट इंडिजला जिंकवून दिलं. या मॅचमध्ये सिमन्स बुमराह आणि अश्विनच्या बॉलिंगवर आऊट झाला होता, पण हे दोन्ही नोबॉल असल्यामुळे त्याला जीवनदान मिळालं होतं.