मोहाली :  न्यूझीलंडच्या ऑलराउंडर जिम्मी नीशामने मान्य केले की विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने त्यांच्याकडून तिसरी वन डे मॅच खेचून नेली. नीशामच्या ४७ चेंडूत ५७ धावांच्या खेळीने न्यूझीलंडने २८५ धावां केल्या. त्यानंतर कोहली नाबाद १५४ आणि धोनीच्या ८० धावांच्या खेळीने भारताने सात गडी राखून सामना खिशात घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निशाम म्हणाला, आम्ही चांगली फलंदाजी केली पण स्कोअर थोडा कमी राहिला. आम्ही दुसऱ्या हाफमध्ये इतकी खराब गोलंदाजी कधीच केली नव्हती. याच काळात विराट आणि धोनीने शानदार फलंदाजी केली.  लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वश्रेष्ठ टीम असताना नशीबाने साथ द्यायला हवी पण ती नाही मिळाली. 


तो म्हणाला, आम्हांला ४० ते ४५ षटकात विकेट मिळाल्या असत्या तर आमचे मॅचवर नियंत्रण आले असते. विराटने आमच्याकडून मॅच खेचून नेली.