PHOTOS: छठपूजा करताना शेंदूर नाकापर्यंत का लावतात? कारण ऐकून चकित व्हाल

Mon, 20 Nov 2023-6:09 pm,

सनातन धर्मात सिंदूर लावणे हे लग्ना झाले आहे याचं लक्षण मानले जाते.

 

कार्तिक महिन्याच्या सहा तारखेला छठ हा सण साजरा केला जातो आणि छठ पूजाच्या वेळी महिला नाकापासून कपाळापर्यंत सिंदूर लावतात.

कारण असे मानले जाते की स्त्री जितका जास्त काळ सिंदूर लावतील तितका जास्त काळ त्यांचा नवरा जगेल.

छठ पूजाच्या वेळी स्त्रिया आपली मुले आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात आणि त्यामुळे पतीसाठी लांब सिंदूर ही लावतात कारण हे अतिशय शुभ मानला जाते. 

 छठ पूजेची श्रद्धा अशी आहे की, हा सिंदूर कुमारी मुलीवर पडला तर तिचे लग्नही लवकर होते.

सिंदूर जितका होऊ शकेल तितकं लांब भरावा असे मानले जाते तर काही लोक असे हि म्हणतात की सिंदूर पाहिल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात.  

 

ज्याप्रमाणे उगवता सूर्य सर्वांसाठी चांगला असतो, त्याचप्रमाणे विवाहित स्त्रीसाठी केशरी सिंदूर चांगला मानला जातो. म्हणूनच छठपूजेच्या वेळी उपवास करणाऱ्या महिला  पूर्ण शृंगार करतात, आणि त्यांचा हा शृंगार सिंदूरशिवाय अपूर्ण असतो.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link