पावसाच्या आगमनासाठी `बेडकांचं`लग्न !
महाराष्ट्रात दडी मारलेला पाऊस हळूहळू परतला आहे. परंतू भारतात इतर भागात उष्णतेने नागरिकांची काहिली होत आहे. मध्यप्रदेशात पावसाच्या आगमनासाठी इंद्रदेवाला साकडं घालण्यात आलं आहे. छतपूरमध्ये बेडकांचं लग्न लावण्यात आलं आहे.
या लग्नादरम्यान सारे रीतिरिवाज करण्यात आले. या लग्नसोहळ्यादरम्यान महिला आणि बालविकास राज्यमंत्री ललिता यादव सहभागी होत्या.
बेडकांचं लग्न लावल्यानंतर राज्यात चांगला पाऊस होतो अशी येथील लोकांंची धारणा आहे.
मध्यप्रदेशाप्रमाणेच वाराणसीमध्येही बेडकाचं लग्न होणार आहे. लवकर पावसाचं आगमन व्हावं याकरिता अशाप्रकारचे लग्न सोहळे केले जातात.
बेडकांच्या या लग्नसोहळ्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला होता. या सोहळ्यात सहभागी होणं अनेकांना शुभ वाटतं. (फोटो साभार- एएनआई)