मुंबई : समुद्र शास्त्रामध्ये अशी बरीच माहिती आहे, जी आपल्याला थक्क करुन सोडते. मानवी शरीर हेसुद्धा त्याच्या भविष्याचे संकेत देत असतं यावर समुद्र शास्त्रामध्ये भर देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहितीये का, पायांचा आकारही भविष्य, एखाद्याचा स्वभाव याविषयी खूप काही सांगतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण असतं भाग्यवान? 


समुद्र  शास्त्रानुसार मऊसूत, नितळ आणि लालसर रंगांचे तळवे असल्यास अशी मंडळी प्रचंड नशीबवान असतात. त्यांच्यावर लक्ष्मीची कायम कृपा असते. 


पायाचे तळवे सपाट असणारे लोक खूप मेहनती असतात. मेहनतीच्या बळावर पुढे जाण्यावर त्यांचा विश्वास असतो. ही माणसं कोणाच्याही अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे सरसावतात. 


कोणी राहावं सतर्क? 


ज्या मंडळींच्या पायांचे तळवे सफेद रंगांचे असतात त्यांना सदैव सतर्क राहण्याची गरज आहे. ही माणसं सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात, कोणताही विचार न करता निर्णय घेतात. पण, त्यांना चूक काय आणि बरोबर काय हे जाणण्याची नितांत गरज आहे. 


पायावर रेषा असल्यास... 


तळव्यांवर टाचेपासून सुरुवात होऊन अंगठ्यापर्यंत एक रेष गेली असल्यास ही मंडळीसुद्धा नशिबवान असतात. त्यांना कधीच आर्थिक चणचण भासत नाही. पण, जर तळव्यांना भेगा असतील, त्वचा रुक्ष असेल तर अशा मंडळींना मात्र संघर्ष चुकणार नाही. काळवंडलेले तळवे दारिद्र्याकडेही खुणवतात. तेव्हा पायाचे तळवेही जपा... 


(झी 24 तास या माहितीची खातरजमा करत नाही. ही माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे.)